"काय बे. काय पाहून राह्यला बे?"
राहूलचा आवाज ऐकताच संजय दचकला आणि त्याने समोर उघडलेली विंडो मिनिमाइझ केली. राहूल म्हणजे संजयचा रुममेट. पाच दिवसापूर्वीच संजय मुंबईत आला आणि दुसऱ्या एका मित्राच्या ओळखीनी राहूलबरोबर रुममेट म्हणून राहू लागला.
तसं त्याला राहुलला घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं. राहूल बाहेर गेला होता आणि संजय, तो एकटाच असल्याने, जे इतर लोक असताना बघता येत नाही, ते काँप्युटरवर बघत होता. तितक्यात राहूल आला. आता राहूल कसा आहे, ह्याची संजयला काहीच कल्पना नव्हती म्हणून त्याने दचकून विंडो मिनिमाइझ केली. तो जे बघतोय ते राहुलने बघू नये म्हणून.
" लाजला का बे? बघू ना"
" अरे काही नाही. मी आपलं असंच"
" अरे संज्या साल्या दाखव ना काय बघतोय ते?"
असं म्हणून राहुलने काँप्युटरचा ताबा घेतला आणि संजय जे काही बघत होता ते भरपेट निरखून म्हणाला,
" अरे संज्या, लाजायचं काय त्यात बे? एकदम कंडा माल आहे, साला गोऱ्या पोरींची मजाच काही और"
" ... "
" अरे भरपूर स्टॉक आहे इथे. पाहिजे ते मनसोक्त बघून बघ काय?"
" हो ठीक आहे"
" पुण्याहून आला ना बे तू?"
" हो. हो. पुणंच"
" हं. बुधवार पेठचा नूर पाहिला की नाही बे?"
" . ..."
" अरे राजा लाजतो काय? गेला तर हो म्हणून टाक. नाही गेला तर नाही म्हणून टाक ना बे?"
" नाही गेलो"
" तरीच तू इंटरनेटवर पोरी बघत राह्यलाय. साल्या खरा माल खाऊन बघ एकदा मग हे इंटरनेट वगैरे सगळं विसरून जाशील"
" हं"
" निदान गर्ल फ्रेंड तरी एखादी?"
" नाही"
" कमाल अहे. तू बुधवार पेठेत गेला नाही, तुझी गर्ल फ्रेंड नाही? मग मजा काय बे तुझ्या आयुष्यात? पुरुषासारखा पुरूष तू, एक बाई नाही मिळत तुला?"
" ..."
" बरं चल, नाही तर नाही. आता माझ्या वरोबर आहे ना तू. मग चिंता सोड. काय? आज रात्री नको, मला वेळ नाहीये, पण उद्या तुला घेऊन जाईन"
" कुठे. मला तसलं काही...."
" तसलं काही म्हणजे? साल्या मी सांगतो तुला. संधी मिळत नाही ना तोपर्यंत सगळेच साधू. एकदा पोरगी हाताला लागली की मग ह्या साधूंचे होतात संधीसाधू"
" अरे तसं नाही रे?"
" मग कसं? छक्का आहे का बे तू?"
" अरे पण ...."
" पण बीण काही नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. छक्का आहे का तू?"
"....."
" बोल ना साल्या"
" नाही"
" नाही ना? मग उद्या रात्री मी नेतो तिथे यायचं. जास्त बोलायचं नाही. काय?"
" बरं पण?"
" पुन्हा पण? माझं ऐक. भूक लागली की जेवतो ना बे तू? मग इथेच कशाला मन मारायचं? भूक लागली की भरपेट जेवायचं. काय? लोक काय म्हणतील ह्याचा विचार नाही करायचा. काय?"
" बरं"
दुसऱ्या दिवशी रात्री भीत भीतच संजय राहूलबरोबर बाहेर पडला. दोघेही टॅक्सी करून शहराच्या एका बेजान शांत कोपऱ्यात पोहोचले. इथे काही तसलं चालत असेल अशी संजयला शंकासुद्धा आली नाही. शहराचा दिवसा गजबजलेला भाग तो, पण रात्री एकदम सुनसान वाटत होता. रस्त्याच्या कडेला कुठे एखाद दोन भिकारी, आपला दिवस संपवून झोपायच्या तयारीत दिसत होते. तेवढेच. बाकी, रस्त्यावरची एकदोन केकाटणारी कुत्री सोडली तर सारं कसं सामसूम होतं.
ते दोघंजण मुख्य रस्त्यावरून एका गल्लीत शिरले. गल्लीच्या दुसऱ्या टोकाला थोडी चहल पहल दिसत होती. दोन्ही बाजूला असलेली दुकानांची रांग पकडत ते गल्लीच्या दुसऱ्या टोकला पोहोचले. तिथे एक पानाच ठेला होता. लांबून दिसत असलेली गर्दी त्या ठेल्याभोवतीचीच होती. पण संजयला ही गर्दी अनोळखी होती. सगळे जण आपल्याकडेच पाहतायत असं त्याला वाटत होतं. पण त्या गर्दीला संजयची अजिबात पर्वा नव्हती. पांढरा शर्ट हा तिथल्या फॅशनचा ट्रेंड आहे की काय असं संजयला वाटून गेलं. कडकडीत इस्त्री केलेले पांढरे शर्ट आणि गळ्यात कसलातरी रंगीबेरंगी रुमाल असे काहीसे कपडे बऱ्याच लोकांनी घातले होते.
पानाच्या ठेल्याच्या बाजूला एक काळ्या रंगाचं पॉलिश केलेलं लाकडी दार होतं. दार एकदम चकचकीत होतं. दाराच्या दोन्ही बाजूंना गुंडासारखे दिसावेत असे दोन लोकं उभे होते. त्यांचे डोळे सतत टकमकत होते. येण्या जाणाऱ्याकडे लक्ष ठेऊन होते. दारावर एक छोटीशी पाटी होती "ओऍसिस रेस्टॉरंट, बार अँड परमिट रूम".
" पान खाणार काय बे?" राहूलच्या आवजाने संजय दचकला.
" नाही नको"
" पुन्हा लाजला काय तू? ओऍसिसमध्ये जायचं तर आधी पान तर खायला पाहिजे ना बे?"
" बरं"
दोघेही पानाच्या दुकानासमोरच्या गर्दीमध्ये मिसळले. राहूलने एक ५५५ चं पाकीट घेतलं, सांजयला सिगरेट ऑफर केली. संजय नाही म्हणाला. पानवाल्याने हातातलं पान गिऱ्हाइकाच्या हातात सरकवलं आणि आपला मोर्चा राहूलकडे वळवला.
" कौनसा पान साहेब?"
" बनारसी एकसोबीस कच्चा पक्का इलायची. तुल काय रे?" राहूलने संजयला विचारलं.
" बनारसी मसाला पान"
" मसाला पान कसलं बे खातो तू. ते बायकांचं पान. ज्या पानात तंबाखू नाही ते कसलं पान. एकसोबीस सांगू का बे?"
" नको नको. मला सवय नाही."
" बरं नाही तर नाही. काय बे तुम्ही पुण्याची पोट्टी, तंबाखू नाही, सिगरेट नाही? कसं काय व्हायचं बे तुझं?"
आपापलं पान तोंडात सरकवून ते ओऍसिसच्या दरवाज्याजवळ पोहोचले. बाहेरच्या गुंडांची त्याला भीतीच वाटली. पण त्या दरवाज्याजवळ पोहोचताच, जादूची छडी फिरवल्यासारखे ते भयानक गुंड मृदू झाले. कमरेत थोडंसं झुकून त्यतल्या एकाने, दोघांना वेलकम म्हटलं. दुसऱ्याने दरवाजा उघडला.
आतमध्ये रेस्टॉरंटसारखं काही असेल असं संजयला वाटत होतं, पण दरवाजा उघडला तोच मुळी एक लांबच लांब पॅसेजमध्ये. दोन्ही भिंतींवर लाकडी काम केलेलं होतं, जमीनीवर मळकट फाटकं कार्पेट होतं. एक माणूस त्यांना सामोरा आला. राहूलक्डे बघून तो ओळखीचं हसला आणि त्या दोघांना समोरच्या दरवाज्यापर्यंत घेऊन गेला. दरवाजा उघडला तसा आतून एकदम जोरात संगीत ऐकू यायला लागला. कुठल्या तरी नव्या हिंदी चित्रपटातलं गाणं असावं असं संजयला वाटलं पण ते इतक्या जोरात लावलं होतं की त्याचे शब्दच नीट ऐकू येत नव्हते.
राहूलच्या मागे मागेच तो त्या आवाजाने भरलेल्या खोलीत शिरला आणि क्षणभर तो जागच्या जागीच खिळला. समोर एक मोठा हॉल पसरला होता. भिंतींच्या कडेकडेने काही सोफे लावलेले होते. खोलीच्या एका टोकाला बार होता. सोफ्यांवर पुरुष बसले होते. काही टक्कल पडलेले, काही पोटंसुटलेले तर काही अगदी नुकतीच मिसरुड फुटलेले. डिस्को लाइटस चा धिंगाणा चालू होता, त्यामुळे नीटसं काही दिसत नव्हतं. पण खोलीच्या मध्यभागी सुमारे पंधरा ते वीस मुली त्या संगीतावर नाचत होत्या.
"क काय बे आवडलं की नाही" राहूल संजयच्या कानात ओरडला.
" काय?" संजयला काहीच ऐकू गेलं नाही.
" म्हटलं आवडला की नाही बे आमचा ओऍसिस"
"......"
एका मोक्याच्या सोफ्यावर एकच माणूस बसला होता. त्याच्या बाजूला राहूल बसला आणि शेजारी त्याने संजयला बसवलं. डान्स्बार म्हणतात तो हाच आणि बारबाला म्हणतात त्या ह्याच, संजयने मनाशी ताडलं. खरंतर त्या मुली जे काय नाचत होत्या त्यात नाच काही नव्हताच. एका जागी उभ्या राहून त्या नुसत्या थोडक्या हलत होत्या. त्यांच्या कपड्यातही काही उत्तान वगैरे नव्हतं. सर्वांनीच घागरा चोली किंवा पंजबी ड्रेस असे सर्वांग झाकणारे कपडे घातले होते. पहिला धक्क ओसरल्यावर संजयला मनातल्या मनात हसूच आलं. काय म्हणून इतके पुरुष इथे येतात आणि पैसे उधळतात?
राहूलने मागवलेली ड्रिंक्स घेऊन एक बाई आली. ती तितकीशी तरुण नव्हती. म्हणजे नाचणाऱ्या मुलींएवढी. नाही हो म्हणता म्हणता शेवटी राहूलच्या आग्रहाखातर संजयने दारू प्यायलीच. आता संजय तिथे रुळला होता. पहिला नवखेपणा गेला होता. आणि दारून विवेकाला झोपवलं होतं.
" काय संज्या मजा येतेय का साल्या"
" येतेय येतेय"
" न यायला काय झालं साल्या. फुकट दारू प्यायल्यावर कुणालापण मजा येईल. पोरी आवडल्या का?"
" राहुल्या, अरे काय आहे काय त्यांच्यात आवडण्यासारखं? पूर्ण कपडे घातलेत. चेहेऱ्यावरची माशी पण हलत नाहीये. नाच तर सॉलिडच. पण तरी आवडलं"
" आयला का का? सगळं न आवडूनसुद्धा तुला आवडलं? का?"
" लेका. आयुष्यात आपण काय केलं?"
" काय?"
" दुसऱ्याच्या तालावर नाचलो. आईबापांच्या, शिक्षकांच्या, ऑफिसमध्ये बॉसच्या. आज कुणीतरी माझ्या तालावर नाचतंय, ह्याचीच मजा वाटतेय मला"
बोलता बोलता त्याच्या लक्षात आलं की संजय समोर नाहीच आहे आणि तो भलत्याच माणसाशी बोलतोय. दारू त्याच्या डोक्यात चांगली भिनली होती आणि तो स्वैर माहौल, त्याला बंधनमुक्त असल्याचं समाधान देत होता. धुसर डोळ्यांनी तो राहुलला शोधायला लागला. राहुल कुठेच दिसत नव्हता. तितक्यात मघाशी दारू घेऊन येणारी बाई त्याच्याजवळ आली, त्याला हात देऊन तिने उठवलं आणि खोलीच्या दरवाज्याशी नेलं. संजयला तिची कीव आली. ओसरलेलं तारुण्य चेहेऱ्यावर दिसत होतं. तारुण्य नाही म्हणून नाच नाही. नाच नाही म्हणून वेट्रेस. दरवाजाशी तिने त्याला, लोकांना खोलीच्या आत सोडणाऱ्या माणसाच्या ताब्यात दिलं.
" क्यों साहब अंदर ले चलू?" त्या माणसाने विचारलं
" अंदर किधर?"
" अरे देखो तो साहब. आपके दोस्तभी अंदरही है"
" रहूल अंदर है क्या? फिर चलो चलो. नहीतो इधरी सोना पडेंगा मेरेको"
तो माणूस संजयला घेऊन आणखी आत निघाला. मघाच्या हॉलचा होता तसाच एक दरवाजा त्याने उघडला संजयला आत ढकलून बाहेरून बंद केला. आतमध्ये पूर्ण अंधार होता. टक्क डोळे उघडूनही त्याला काहीही दिसत नव्हतं. पण काही अस्पष्ट आवाज मात्र त्याला ऐकू येत होते. आणि त्या आवाजांवरून ती खोली मघाच्या खोलीएवढीच असावी असं संजयला वाटलं. आता इथे राहुलला शोधायचं कसं ह्याचा विचार तो करीत असतानाच, एका नाजूक हातानं त्याचा हात पकडला. भडक सेंटचा वास त्याच्या नाकपुड्यात शिरला. पण त्या स्पर्शाची नशा काही वेगळीच होती.
" आओ साहब"
असं म्हणून त्या मुलीने संजयला खोलीच्या न दिसणाऱ्या कुठल्यातरी कोपऱ्यात नेलं. पायला लागलेल्या सोफ्याला तो अडखळला. तिने त्याला सोफ्यावर बसवलं आणि सुरू झाला शरीरांचा एक खेळ. संजय ह्या खेळात पुरता नवखा होता. पण ती मुलगी मात्र होती. आणि पराभव झाला तरी संजयला हा खेळ थांबवावासा वाटत नव्हता. तो गंध, स्पर्श, आणि पोटातली दारू हे मिश्रण अतिशय स्फोटक होतं. वेगळीच अनुभूती देणारं होतं. जे त्याला आधी कधीही मिळालं नव्हतं. पण ह्या अनुभूतीला फक्त एकंच गालबोट होतं. आजूबाजूच्या अंधारामुळे त्या सुंदरीचा चेहेरा मात्र त्याला दिसत नव्हता.
" इधर इतना अंधेरा क्यूं है?"
" साहेब. आपल्याला रौशनीशी काय मतलब?"
" तुझ्यासारख्या अप्सरेला बघता येत नाही"
" हे जगंच काळोखी आहे साहेब. तुम्ही चांगल्या घरातले. कुणी पाहिलं तुम्हाला इथे माझ्यावरोबर तर काय नाव राहिल तुमचं? आणि आम्हालापण आमची ओळख छुपी ठेवायला हवी की नको?"
त्याला पटलं नव्हतं. काहीही करून त्याला तिला पाहायचीच होती.
" सिगरेट मिळेल का? खूप तल्लफ आलेय" सिगरेट पेटवायची कशी हेसुद्धा माहीत नसलेल्या संजयने सिगरेट मागवली.
" मिळेल ना साहेब. कोणती मागवू?"
" ५५५" राहुलचा ब्रॅंड संजयने ठोकून दिला.
सिगरेट आणि काड्यापेटी घेऊन कुणीतरी संजयच्या बाजूला येऊन उभं राहिलं. संजयने सिगरेट तोंडात घातली. बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीने काडी पेतवली. संजयने ती फुंकरीने विझवली आणि त्या माणसाकडून काड्यापेटी घेतली.
" अभी नही. बादमें जलाऊगा"
तो माणूस गेला. संजय तिच्या दिशेला वळला. आता त्याला हवी ती संधी मिळाली होती. त्याने झटकन काड्यापेटीतली काडी काढली आणि पेतवली. पेटवलेली काडी तिच्या चेहेऱ्यासमोर नेली. त्याला तिला पाहायचं होतं. अनुभूतींच्या हिंदोळ्यावर त्याला झुलवणाऱ्या अप्सरेचा चेहेरा त्याला पाहायचा होता. तो गंध, तो स्पर्श जिच्यापासून येत होता त्या सुंदरीला त्याला पाहायचं होतं.
आणि त्या काडीच्या अंधूक प्रकाशात त्याला दिसली ती. हो तीच. मघाशी दारू घेऊन फिरणारी बाई. जिची कीव वाटली होती त्याला. ओसरलेलं तारुण्य. नाच नाही. म्हणून पैसा नाही. तीच. क्षणभर त्यालाच त्याची कीव वाटली. जिला आपण अप्सरा समजत होतो ती ही म्हातारी?
संजय तसाच ऊठला आणि ज्या दिशेला दरवाजा आहे असं त्याला वाटलं त्या दिशेला निघाला. वाटेत धडपडला, कुणाच्यातरी शरीरांवर, कुणीतरी त्याला सावरलं, दरवाज्यापर्यंत घेऊन गेलं. दरवाजा उघडला. त्याला फक्त इथून बाहेर जायचं होतं. पण बाहेरचा माणूस वसूलीसाठी उभा होता. धावणाऱ्या संजयला त्याने अडवलं.
" साहब. पैसा देके जाव."
" पैसे? कसले पैसे?"
" अरे बाई के साथ जो कर रहेथे ना? उसके पैसे"
" बाई? कसली बाई? ती म्हातारी. खोटारडी. अंधारात फसवत होती मला"
त्याच्या पाठोपाठ तीही खोलीबाहेर आली होती. म्हातारी ह्या उल्लेखामुळे तिला कदाचित वाईट वाटलं.
" साहेब. आत नाचणाऱ्या पोरींइतकी नाही मी तरूण. पण मी कधी म्हटलं का तुम्हाला मी तरूण आहे म्हणून? कुणाला खोटारडी म्हणता साहेब? अख्ख्या पुरुष जमातीचा खोटेपणा सहन करणाऱ्या मला? का आलात तुम्ही इथे? तुमची भूक भागवायलाच ना? खोटेपणा तुमचा आहे साहेब. तुम्ही इथे येता कारण तुम्हाला ते खोटं खोटं सूख हवं असतं. अहंकार कुरवाळायचा असतो तुम्हाला स्वतःचा. तुमच्या तालावर नाचणारं कुणी आहे हा अहंकार. तुमच्या तालावर नाही नाचत आम्ही साहेब. पैशाच्या तालावर नाचतो. तुमचं सूख तुमचं समाधान तुम्ही विकत घेता साहेब. तुम्हाला वाटतं की तुम्हाला ते मिळतंय. पण भास असतो साहेब नुसता भास. सगळं मिथ्या आहे. त्या नाचणाऱ्या मुली. दारू पाजणारी मी. आतमध्ये तुम्हाला भेटलेली तुमची अप्सरा, सगळं सगळं मिथ्या आहे. एक आभास आहे. जो अनुभवण्यासाठी तुम्ही इथे येता. पैसे उधळता. सगळा नुसता आभास. मुकाट्याने पैसे भरा साहेब आणि मग बाहेर पडा ह्या मिथ्यानगरीतून"
संजय खिशातून पैसे काढतो आणि बाहेर पडतो. मिथ्येतून सत्याकडे.
Tuesday, May 19, 2009
Wednesday, May 06, 2009
आम्ही मतकरी.
नाही. मतकरी हे आमचं आडनाव नाही.
खरंतर मतकरी ही व्यक्ती नसून मतकरी ही एक प्रवृत्ती आहे असं एक टाळ्या खेचणारं वाक्य टाकायची आम्हाला तीव्र इच्छा झाली होती, पण ती आम्ही दाबली. सांगायचा मुद्दा हा की मतकरी म्हणजे येता जाता, इथे तिथे, हगल्या पादल्या, आमच्यासारख्या, ज्या लोकांना आपल्या मताची पिंक टाकायची सवय असते ती लोकं. पिंक ह्या शब्दाचा राम सेनेच्या मुतालिकांना स्त्रीवर्गाने पाठवलेल्या चड्ड्यांच्या रंगाशी काहीही संबंध नाही हा खुलासा करणं आवश्यक आहे. पिंक म्हणजे पान खाऊन टाकल्याने जिच्यामुळे भिंती छान रंगवून काढता येतात ती.
असो नमनालाच घडाभर तेल झालेलं आहे. मूलस्थान पुणे असल्याने आणि आपल्याला सगळं कळतं असा आमचा समज (गैरसमज नव्हे) असल्याने येता जाता मतांच्या पिंका टाकणं हा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. पण मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आपली मुंबई स्वच्छ मुंबई ह्या नाऱ्याला ( नारा म्हणजे घोषणा. ह्या वाक्याचा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांशी काहीही संबंध नाही हा खुलासा) जागून, आम्ही पिंका टाकून भिंती रंगवणं थांबवलेलं आहे, आणि आमच्या मतांच्या वैचारिक इ-पिंका टाकून समस्त मराठी इ-वाचकवर्गाला इ-रंगवण्यासाठी ह्या ब्लॉगचा वापर सुरू केलेला आहे.
तर अशा ह्या आमच्या मताला कुणीही अजिबात किंमत देत आलेलं नाही. लहान असताना आमची मुलं देत असत. पण आपल्या आईने (पक्षी आमच्या हिने) रुपयाच्या अवमूल्यनाला स्पर्धा म्हणून चालवलेल्या, माझ्या मताच्या अवमूल्यनाने, प्रभावित होऊन, त्यांनीही आमच्या मताला किंमत देणं सोडलं. तसं आमच्यासारख्या चिरगूट माणसाच्या मतात किंमती काही नसतंच असा आमच्या एव्हाना समज होऊन गेलेला.
पण अचानक काय झालं कळलं नाही. जादूची कांडी फिरावी तसे दिवस फिरले. कालपर्यंत आमचा यथेच्छ बाजा बजावणारे लोकं आम्हाला राजा म्हणू लागले. कारणही तसंच झालं, निवडणुका जाहीर झाल्या. उभ्या देशाचा पंतप्रधान निवडायची जबाबदारी कुणीतरी आमच्यावर टाकली. आमच्या मतांच्या पिंका झेलायला अचानक बड्या बड्या आसामी (पक्षी मोठी माणसं. ह्या शब्दाचा आसाम राज्याशी काहीही संबंध नाही हा खुलासा) पिकदाण्या घेऊन कंबरेत वाकून अजिजीने उभ्या असलेल्या दिसायला लागल्या.
आम्हाला तर चक्क लॉटरी लागल्यासारखंच बाटू लागलं. पण आमच्या डोक्यावरचा ताण एकदम वाढला. देशाचा पंतप्रधान निवडण्यारासखं अवघड काम आमच्या खांद्यावर येऊन पडलं. मुळातच चिरगूट माणूस असल्याने आमचे खांदे पडलेले. त्यात हे मणामणाचं ओझं येऊन पडल्याने आमचे खांदे अधिकच पडल्यासारखे दिसू लागले. कशा कशात म्हणून लक्ष लागेना. रात्र रात्र झोप लागेना आणि रात्री झोप न लागल्याने दिवसा झोपा काढण्याची वेळ आली. अर्थात आम्ही वर्षानुवर्ष आमच्या कार्यालयात हेच करत आलोय असं आपलं आमच्या हिचं मत.
असो तर एकंदरीत परिस्थिती गंभीर झाली. असं काही झालं, आणि आम्हाला काहीही सुचलं नाही की आम्ही चक्क दूरचित्रवाणीकडे वळतो. नाही, नाही. आमच्या चाळीच्या कोपऱ्यावर असलेल्या वाण्याचं नाव "दूरचित्र" असं नाहीये. ज्याला आपण शुद्ध मराठीत टीव्ही म्हणतो त्याला अतिशुद्ध मराठीत दूरचित्रवाणी असे म्हणतात. असो, तर सांगायचा मुद्दा हा की तिथे आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. आमच्या एका लाडक्या अभिनेत्याने आम्हाला चक्क मुद्द्यांवर मतदान करायचं आवाहन केलं.
झालं. उत्तर मिळालं. आमच्या खांद्यावरचं मणामणाचं ओझं उतरलं आणि आम्ही झोकात आमची पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी पार पाडतोय, अशी स्वप्न बघत, आम्ही निवांत झोपी जातो न जातो तोच, प्रकरण मुद्द्यावरून गुद्द्यावर आलं. सकाळी न अलेल्या पाण्याने, आणि भारनियमनाने बंद पडलेल्या पंपामुळे, तोंडाचं पाणी पळालेली आमची ही, भयंकर संतापली आणि आम्हाला झोपलेलं पाहून चांगलीच खवळली, आणि गुद्द्यावर गुद्दे हाणून आम्हाला जागं करायला लागली. जनता मुद्द्यावरून गुद्द्यावर इतक्या पटकन का उतरते ह्याचा थोडासा खुलासा आमच्या चिरगूट बुद्धीला झाल्याचा आम्हाला भास झाला. पण झोपल्याला जागं करता येते, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही, हे आम्ही चाणाक्षपणे शिकून घेतल्यामुळे आम्ही गुद्दाप्रहार सहन करत मुद्द्यांचा विचार करता करता पडून राहिलो.
पण हे मुद्दे शोधायचं काम भलतंच कठीण निघालं हो. अर्थात आमच्यासारख्या चिरगूट माणसाच्या बुद्धीची झेप ती किती? ह्या आपल्या अभिनेत्यांना आणि त्यांच्यापेक्षाही अधिक चांगला अभिनय करणाऱ्या आपल्या नेत्यांना समजणाऱ्या गोष्टी. तरीही आम्ही बातम्यांतून, भाषणातून, वर्तमानपत्रांतून मुद्दे शोधत राहिलो. ते काही आम्हाला मिळाले नाहीत. हे लपलेले मुद्दे हुडकून काढण्यासाठी करमचंद किंवा परमवीर वगैरे छापाचा एखादा हेर नेमावा असंही आम्हाला वाटलं, पण आमच्यासारख्या चिरगूट माणसाला ते परवडण्यासारखं नसल्याने तो विचार आम्ही सोडून दिला.
दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय नेतृत्व असलेल्या एका पक्षाला आम आदमीचा पुळका आला. आम्हाला मराठी सोडून कुठलीही भाषा कळत नाही. त्यात निवडणुका एप्रिल मेच्या महिन्यात. आंब्यांचा सीझन. त्यामुळे हा पक्ष निवडून आला तर सर्व आदम्यांना आम वाटणार असा समज करून घेऊन आमच्या तोंडाला पाणी सुटलं. पण फुकटचे आम खाण्याचे मनातले मांडे मनातच राहिले. ह्या आमचा त्या आमशी काही संबंध नाही हे कळताच आमचा हिरमोड झाला.
दुसऱ्या एका धर्मपरायण आणि गेल्या काही वर्षात मनमिळाऊ झालेल्या पक्षाला रामाचं मंदिर आठवलं. अयोध्येत रामाचं मंदिर बांधायच्या विचाराने ते एकदम भगवेच झाले. पण आम्ही गिरगावातल्या राम मंदिरात गेलो तरी हे गोऱ्या रामाचं का काळ्या रामाचं ह्याचा खुलासा आमच्या बालबुद्धीला मूर्तीचा रंग पाहिल्याशिवाय होत नाही. त्यात अयोध्येत बांधलं जरी ह्यांनी राम मंदिर तरी तिथे सहकुटुंब सहपरिवार रामरायाचं दर्शन घेऊन येण्याचीही ऐपत आम्ही आयुष्यभरात कमावली नसल्याने त्या राममंदिराचा आम्हाला फायदा कोणत्या खात्यावर लिहिणार?
इतरही काही निळे, लाल, हिरवे, पिवळे आणि अलीकडेच भगव्यातून जन्याला आलेले रंगीबेरंगी पक्ष होते. कुणी आम्हाला मराठी म्हणत होता, कुणी मराठा म्हणत होता, कुणी कुणबी, कुणी कोळी, आग्री, भय्या, मुसलमान, शीख आणि कुणी अजून काही म्हणत होता. पण वेगवेगळ्या जातीचा त्यांना आलेला पुळका सोडला तर एकजात कुणाकडेही कसलाही मुद्दा शोधूनही सापडला नाही.
आता मात्र आमची पंचाईत झाली. मतदानाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. उद्या आम्ही चुकीचा पंतप्रधान तर निवडणार नाही ना ह्या विचाराने रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. चुकून माकून लागलीच डुलकी तर कमळात बसलेल्या हत्तीवर सायकल चालवत एका हाताने धनुष्य पेलून दुसऱ्या हाताने इंजिनावर बाण मारणाऱ्या माणसाची भयानक स्वप्न मला पडायला लागली.
होता होता मतदानाचा दिवस उजाडला. आमच्या मित्रवर्यांना घेऊन मतदानास जावे म्हणून आम्ही त्यांच्या घरी पोचलो तर त्यांची सामानाची आवरा आवर चाललेली. चार दिवस सलग सुटी म्हणून ते फिरायला म्हणून बाहेर निघालेले. फार आनंदात दिसत होते. आम्हालाही एकदा वाटलं की झटकून द्यावी जबाबदारी आणि पळून जावं कुठेतरी.
पण ते शक्य नव्हतं. मनाची चलबिचल लपवत लपवत आम्ही मतदान केंद्राकडे चालायला लागलो. चालीत एक वेगळाच आत्मविश्वास आलेला. चिरगूटपणाचं लक्षण असलेले आमचे पडेल खांदे वर आलेले. एका राजासारखे आम्ही भारदस्त चालत केंद्राकडे जायला लागलो. वाटेत दिसणारे सगळेच आपल्या काह्यात आहेत असं वाटायला लागलं. कोणे एके काळी तरुण बिरुण असताना लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं वाटायचं, तसंच आज वाटायला लागलं. त्या तंद्रीतच आम्ही केंद्रावर पोचलो. केंद्रावरचे सरकारी अधिकारीही कधी नव्हे ते अदबीने वागत असल्याचं जाणवलं.
ज्याचसाठी केला होता अट्टहास हाच तो दिवस. आमच्या पत्रिकेत राजयोग होता तो असा मतदानाच्या दिवशी सिद्ध झाला. आम्ही आडोशाला गेलो. आम्हाला राजासारखं आधीच वाटू लागल्याने आम्ही एकदम खूश होतो, आता कुणीही निवडून आला तरी काय फरक पडणार होता? आम्ही कुठलंसं बटण दाबलं आणि धुंदीतच बाहेर पडलो.
जसे आम्ही बाहेर पडलो तसे आमचे खांदेही पूर्ववत पडले. गेले काही दिवस माझ्या मताची पिंक झेलायला पिकदाण्या घेऊन आतुरतेने उभे असलेले लोकं कुत्ता जाने आणि चमडा जाने अशा आविर्भावात माझ्याकडे पाहत होते. घरी पोचलो. आजही पाण्याची बोंब होती, विजेचा लपंडाव चालला होता. नळाला न आलेलं पाणी आमची ही आमच्या डोळ्यात काढणार अशी सगळी परिस्थिती होती.
पण मघा मला लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा आत्मविश्वास वाटला होता, त्या भरातच आम्ही घरातल्या नळाला एक जोरदार लाथ हाणली आणि पाठीत जळकं लाकूड मारून हाकलवलेल्या कुत्र्यासारखं केकाटलो.
तेवढाच एक निरर्थक केकाटण्याचा आवाज कानात राहिला.
बाकी सारं कसं शांत शांत होतं.
खरंतर मतकरी ही व्यक्ती नसून मतकरी ही एक प्रवृत्ती आहे असं एक टाळ्या खेचणारं वाक्य टाकायची आम्हाला तीव्र इच्छा झाली होती, पण ती आम्ही दाबली. सांगायचा मुद्दा हा की मतकरी म्हणजे येता जाता, इथे तिथे, हगल्या पादल्या, आमच्यासारख्या, ज्या लोकांना आपल्या मताची पिंक टाकायची सवय असते ती लोकं. पिंक ह्या शब्दाचा राम सेनेच्या मुतालिकांना स्त्रीवर्गाने पाठवलेल्या चड्ड्यांच्या रंगाशी काहीही संबंध नाही हा खुलासा करणं आवश्यक आहे. पिंक म्हणजे पान खाऊन टाकल्याने जिच्यामुळे भिंती छान रंगवून काढता येतात ती.
असो नमनालाच घडाभर तेल झालेलं आहे. मूलस्थान पुणे असल्याने आणि आपल्याला सगळं कळतं असा आमचा समज (गैरसमज नव्हे) असल्याने येता जाता मतांच्या पिंका टाकणं हा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. पण मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आपली मुंबई स्वच्छ मुंबई ह्या नाऱ्याला ( नारा म्हणजे घोषणा. ह्या वाक्याचा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांशी काहीही संबंध नाही हा खुलासा) जागून, आम्ही पिंका टाकून भिंती रंगवणं थांबवलेलं आहे, आणि आमच्या मतांच्या वैचारिक इ-पिंका टाकून समस्त मराठी इ-वाचकवर्गाला इ-रंगवण्यासाठी ह्या ब्लॉगचा वापर सुरू केलेला आहे.
तर अशा ह्या आमच्या मताला कुणीही अजिबात किंमत देत आलेलं नाही. लहान असताना आमची मुलं देत असत. पण आपल्या आईने (पक्षी आमच्या हिने) रुपयाच्या अवमूल्यनाला स्पर्धा म्हणून चालवलेल्या, माझ्या मताच्या अवमूल्यनाने, प्रभावित होऊन, त्यांनीही आमच्या मताला किंमत देणं सोडलं. तसं आमच्यासारख्या चिरगूट माणसाच्या मतात किंमती काही नसतंच असा आमच्या एव्हाना समज होऊन गेलेला.
पण अचानक काय झालं कळलं नाही. जादूची कांडी फिरावी तसे दिवस फिरले. कालपर्यंत आमचा यथेच्छ बाजा बजावणारे लोकं आम्हाला राजा म्हणू लागले. कारणही तसंच झालं, निवडणुका जाहीर झाल्या. उभ्या देशाचा पंतप्रधान निवडायची जबाबदारी कुणीतरी आमच्यावर टाकली. आमच्या मतांच्या पिंका झेलायला अचानक बड्या बड्या आसामी (पक्षी मोठी माणसं. ह्या शब्दाचा आसाम राज्याशी काहीही संबंध नाही हा खुलासा) पिकदाण्या घेऊन कंबरेत वाकून अजिजीने उभ्या असलेल्या दिसायला लागल्या.
आम्हाला तर चक्क लॉटरी लागल्यासारखंच बाटू लागलं. पण आमच्या डोक्यावरचा ताण एकदम वाढला. देशाचा पंतप्रधान निवडण्यारासखं अवघड काम आमच्या खांद्यावर येऊन पडलं. मुळातच चिरगूट माणूस असल्याने आमचे खांदे पडलेले. त्यात हे मणामणाचं ओझं येऊन पडल्याने आमचे खांदे अधिकच पडल्यासारखे दिसू लागले. कशा कशात म्हणून लक्ष लागेना. रात्र रात्र झोप लागेना आणि रात्री झोप न लागल्याने दिवसा झोपा काढण्याची वेळ आली. अर्थात आम्ही वर्षानुवर्ष आमच्या कार्यालयात हेच करत आलोय असं आपलं आमच्या हिचं मत.
असो तर एकंदरीत परिस्थिती गंभीर झाली. असं काही झालं, आणि आम्हाला काहीही सुचलं नाही की आम्ही चक्क दूरचित्रवाणीकडे वळतो. नाही, नाही. आमच्या चाळीच्या कोपऱ्यावर असलेल्या वाण्याचं नाव "दूरचित्र" असं नाहीये. ज्याला आपण शुद्ध मराठीत टीव्ही म्हणतो त्याला अतिशुद्ध मराठीत दूरचित्रवाणी असे म्हणतात. असो, तर सांगायचा मुद्दा हा की तिथे आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. आमच्या एका लाडक्या अभिनेत्याने आम्हाला चक्क मुद्द्यांवर मतदान करायचं आवाहन केलं.
झालं. उत्तर मिळालं. आमच्या खांद्यावरचं मणामणाचं ओझं उतरलं आणि आम्ही झोकात आमची पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी पार पाडतोय, अशी स्वप्न बघत, आम्ही निवांत झोपी जातो न जातो तोच, प्रकरण मुद्द्यावरून गुद्द्यावर आलं. सकाळी न अलेल्या पाण्याने, आणि भारनियमनाने बंद पडलेल्या पंपामुळे, तोंडाचं पाणी पळालेली आमची ही, भयंकर संतापली आणि आम्हाला झोपलेलं पाहून चांगलीच खवळली, आणि गुद्द्यावर गुद्दे हाणून आम्हाला जागं करायला लागली. जनता मुद्द्यावरून गुद्द्यावर इतक्या पटकन का उतरते ह्याचा थोडासा खुलासा आमच्या चिरगूट बुद्धीला झाल्याचा आम्हाला भास झाला. पण झोपल्याला जागं करता येते, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही, हे आम्ही चाणाक्षपणे शिकून घेतल्यामुळे आम्ही गुद्दाप्रहार सहन करत मुद्द्यांचा विचार करता करता पडून राहिलो.
पण हे मुद्दे शोधायचं काम भलतंच कठीण निघालं हो. अर्थात आमच्यासारख्या चिरगूट माणसाच्या बुद्धीची झेप ती किती? ह्या आपल्या अभिनेत्यांना आणि त्यांच्यापेक्षाही अधिक चांगला अभिनय करणाऱ्या आपल्या नेत्यांना समजणाऱ्या गोष्टी. तरीही आम्ही बातम्यांतून, भाषणातून, वर्तमानपत्रांतून मुद्दे शोधत राहिलो. ते काही आम्हाला मिळाले नाहीत. हे लपलेले मुद्दे हुडकून काढण्यासाठी करमचंद किंवा परमवीर वगैरे छापाचा एखादा हेर नेमावा असंही आम्हाला वाटलं, पण आमच्यासारख्या चिरगूट माणसाला ते परवडण्यासारखं नसल्याने तो विचार आम्ही सोडून दिला.
दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय नेतृत्व असलेल्या एका पक्षाला आम आदमीचा पुळका आला. आम्हाला मराठी सोडून कुठलीही भाषा कळत नाही. त्यात निवडणुका एप्रिल मेच्या महिन्यात. आंब्यांचा सीझन. त्यामुळे हा पक्ष निवडून आला तर सर्व आदम्यांना आम वाटणार असा समज करून घेऊन आमच्या तोंडाला पाणी सुटलं. पण फुकटचे आम खाण्याचे मनातले मांडे मनातच राहिले. ह्या आमचा त्या आमशी काही संबंध नाही हे कळताच आमचा हिरमोड झाला.
दुसऱ्या एका धर्मपरायण आणि गेल्या काही वर्षात मनमिळाऊ झालेल्या पक्षाला रामाचं मंदिर आठवलं. अयोध्येत रामाचं मंदिर बांधायच्या विचाराने ते एकदम भगवेच झाले. पण आम्ही गिरगावातल्या राम मंदिरात गेलो तरी हे गोऱ्या रामाचं का काळ्या रामाचं ह्याचा खुलासा आमच्या बालबुद्धीला मूर्तीचा रंग पाहिल्याशिवाय होत नाही. त्यात अयोध्येत बांधलं जरी ह्यांनी राम मंदिर तरी तिथे सहकुटुंब सहपरिवार रामरायाचं दर्शन घेऊन येण्याचीही ऐपत आम्ही आयुष्यभरात कमावली नसल्याने त्या राममंदिराचा आम्हाला फायदा कोणत्या खात्यावर लिहिणार?
इतरही काही निळे, लाल, हिरवे, पिवळे आणि अलीकडेच भगव्यातून जन्याला आलेले रंगीबेरंगी पक्ष होते. कुणी आम्हाला मराठी म्हणत होता, कुणी मराठा म्हणत होता, कुणी कुणबी, कुणी कोळी, आग्री, भय्या, मुसलमान, शीख आणि कुणी अजून काही म्हणत होता. पण वेगवेगळ्या जातीचा त्यांना आलेला पुळका सोडला तर एकजात कुणाकडेही कसलाही मुद्दा शोधूनही सापडला नाही.
आता मात्र आमची पंचाईत झाली. मतदानाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. उद्या आम्ही चुकीचा पंतप्रधान तर निवडणार नाही ना ह्या विचाराने रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. चुकून माकून लागलीच डुलकी तर कमळात बसलेल्या हत्तीवर सायकल चालवत एका हाताने धनुष्य पेलून दुसऱ्या हाताने इंजिनावर बाण मारणाऱ्या माणसाची भयानक स्वप्न मला पडायला लागली.
होता होता मतदानाचा दिवस उजाडला. आमच्या मित्रवर्यांना घेऊन मतदानास जावे म्हणून आम्ही त्यांच्या घरी पोचलो तर त्यांची सामानाची आवरा आवर चाललेली. चार दिवस सलग सुटी म्हणून ते फिरायला म्हणून बाहेर निघालेले. फार आनंदात दिसत होते. आम्हालाही एकदा वाटलं की झटकून द्यावी जबाबदारी आणि पळून जावं कुठेतरी.
पण ते शक्य नव्हतं. मनाची चलबिचल लपवत लपवत आम्ही मतदान केंद्राकडे चालायला लागलो. चालीत एक वेगळाच आत्मविश्वास आलेला. चिरगूटपणाचं लक्षण असलेले आमचे पडेल खांदे वर आलेले. एका राजासारखे आम्ही भारदस्त चालत केंद्राकडे जायला लागलो. वाटेत दिसणारे सगळेच आपल्या काह्यात आहेत असं वाटायला लागलं. कोणे एके काळी तरुण बिरुण असताना लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं वाटायचं, तसंच आज वाटायला लागलं. त्या तंद्रीतच आम्ही केंद्रावर पोचलो. केंद्रावरचे सरकारी अधिकारीही कधी नव्हे ते अदबीने वागत असल्याचं जाणवलं.
ज्याचसाठी केला होता अट्टहास हाच तो दिवस. आमच्या पत्रिकेत राजयोग होता तो असा मतदानाच्या दिवशी सिद्ध झाला. आम्ही आडोशाला गेलो. आम्हाला राजासारखं आधीच वाटू लागल्याने आम्ही एकदम खूश होतो, आता कुणीही निवडून आला तरी काय फरक पडणार होता? आम्ही कुठलंसं बटण दाबलं आणि धुंदीतच बाहेर पडलो.
जसे आम्ही बाहेर पडलो तसे आमचे खांदेही पूर्ववत पडले. गेले काही दिवस माझ्या मताची पिंक झेलायला पिकदाण्या घेऊन आतुरतेने उभे असलेले लोकं कुत्ता जाने आणि चमडा जाने अशा आविर्भावात माझ्याकडे पाहत होते. घरी पोचलो. आजही पाण्याची बोंब होती, विजेचा लपंडाव चालला होता. नळाला न आलेलं पाणी आमची ही आमच्या डोळ्यात काढणार अशी सगळी परिस्थिती होती.
पण मघा मला लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा आत्मविश्वास वाटला होता, त्या भरातच आम्ही घरातल्या नळाला एक जोरदार लाथ हाणली आणि पाठीत जळकं लाकूड मारून हाकलवलेल्या कुत्र्यासारखं केकाटलो.
तेवढाच एक निरर्थक केकाटण्याचा आवाज कानात राहिला.
बाकी सारं कसं शांत शांत होतं.
आपला,
कोहम
9
देवाणघेवाणी
Wednesday, April 22, 2009
कसं काय बरं हाय आय ऍम मुंभाय
मुंबई? बंबई? बॉम्बे? की मुंबाय?
कॉलिडोस्कोप.
ओबेरॉयच्या एकविसाव्या मजल्यावरच्या काचेतून रात्रीचा झगमगाट दाखवणारी, धारावीच्या गल्ल्यातून वाळणाऱ्या चामड्याच्या चळतीमधून नाक दाबून श्वास घेणारी, मलबार हिलच्या टुमदार टेकड्यांमधल्या आलिशान घरातून झोपेशिवाय तडफडत जागणारी किंवा रस्त्याच्या कडेला डोक्यावर टोपली घेऊन घनघोर पावसात निवांत झोपलेली.
फोर्ट फाउंटनमधली जुन्या इमारतींनी सजलेली ब्रिटिश मुंबई, उंचच उंच इमारतींनी विद्रूप झालेली मुंबई. धरण फुटल्यासारखी वाहणारी मुंबई, उष्ण रक्ताचा अभिषेक करून घेणारी मुंबई आणि समुद्राच्या थंड वाऱ्याने गपगार झालेली मुंबई, बॉलीवूडची मुंबई आणि एनसीपीए पृथ्वी वाली मुंबई.
अफाट पैशाने पोट फुटेस्तोवर भरलेली मुंबई, मध्यममार्गी मध्यमवर्गियाची बिचकत जगणारी मुंबई, पोटाची खळगी भरण्यासाठी ओठाला रंग लावून पाय पसरणारी मुंबई, सर्वस्व लुटणारी मुंबई आणि सर्वस्व लुटवणारी मुंबई. रेल्वे लाइनच्या कडेला शरीरधर्म उरकणारी निर्लज्ज मुंबई, लोकल ट्रेन्मधून रेल्वे लाइनच्या कडेला बसलेल्या लोकांना नाकं दाबून शिव्या देणारी मुंबई, आश्वासनं देणारी मुंबई आणि आश्वासनं न पाळणारी मुंबई.
मुंबईत राहणाऱ्यांच्या मनातून उतरलेली मुंबई आणि मुंबईत न राहणाऱ्यांचा मनात भरून राहिलेली मुंबई.
मुंबईचा जावई, बाँबे बॉइज, जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान. मुंबई नगरी बडी बाका. बंबईसे आया मेरा दोस्त, मुंबई तुमची भांडी घासा आमची, मुंबई माझी लाडकी, मी मुंबईकर.
अल्ला हो अकबर, गणपती बाप्पा मोरया, आवाज कुणाचा? जय भीम. जो बोले सो निहाल, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराजकी जय.
केम छो? कैसन हो?
कसं काय बरं हाय आय ऍम मुंभाय.
मुंबई इज फ्युजन. बट मुंबई इज ऑल्सो अ हेल लॉट ऑफ कनफ्युजन.
------------------------
इन्स्पिरेशनबद्दल धन्यवाद....
-----------------------
कॉलिडोस्कोप.
ओबेरॉयच्या एकविसाव्या मजल्यावरच्या काचेतून रात्रीचा झगमगाट दाखवणारी, धारावीच्या गल्ल्यातून वाळणाऱ्या चामड्याच्या चळतीमधून नाक दाबून श्वास घेणारी, मलबार हिलच्या टुमदार टेकड्यांमधल्या आलिशान घरातून झोपेशिवाय तडफडत जागणारी किंवा रस्त्याच्या कडेला डोक्यावर टोपली घेऊन घनघोर पावसात निवांत झोपलेली.
फोर्ट फाउंटनमधली जुन्या इमारतींनी सजलेली ब्रिटिश मुंबई, उंचच उंच इमारतींनी विद्रूप झालेली मुंबई. धरण फुटल्यासारखी वाहणारी मुंबई, उष्ण रक्ताचा अभिषेक करून घेणारी मुंबई आणि समुद्राच्या थंड वाऱ्याने गपगार झालेली मुंबई, बॉलीवूडची मुंबई आणि एनसीपीए पृथ्वी वाली मुंबई.
अफाट पैशाने पोट फुटेस्तोवर भरलेली मुंबई, मध्यममार्गी मध्यमवर्गियाची बिचकत जगणारी मुंबई, पोटाची खळगी भरण्यासाठी ओठाला रंग लावून पाय पसरणारी मुंबई, सर्वस्व लुटणारी मुंबई आणि सर्वस्व लुटवणारी मुंबई. रेल्वे लाइनच्या कडेला शरीरधर्म उरकणारी निर्लज्ज मुंबई, लोकल ट्रेन्मधून रेल्वे लाइनच्या कडेला बसलेल्या लोकांना नाकं दाबून शिव्या देणारी मुंबई, आश्वासनं देणारी मुंबई आणि आश्वासनं न पाळणारी मुंबई.
मुंबईत राहणाऱ्यांच्या मनातून उतरलेली मुंबई आणि मुंबईत न राहणाऱ्यांचा मनात भरून राहिलेली मुंबई.
मुंबईचा जावई, बाँबे बॉइज, जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान. मुंबई नगरी बडी बाका. बंबईसे आया मेरा दोस्त, मुंबई तुमची भांडी घासा आमची, मुंबई माझी लाडकी, मी मुंबईकर.
अल्ला हो अकबर, गणपती बाप्पा मोरया, आवाज कुणाचा? जय भीम. जो बोले सो निहाल, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराजकी जय.
केम छो? कैसन हो?
कसं काय बरं हाय आय ऍम मुंभाय.
मुंबई इज फ्युजन. बट मुंबई इज ऑल्सो अ हेल लॉट ऑफ कनफ्युजन.
------------------------
इन्स्पिरेशनबद्दल धन्यवाद....
-----------------------
आपला,
U2ISolutions
11
देवाणघेवाणी
Saturday, February 28, 2009
नशीब
ब्याऐंशीतली कोणतीतरी संध्याकाळ. अगदी आज असते तशीच असणार तेव्हाही. चौपाटी, रस्त्याच्या बाजूला असलेले भेळवाले, त्यांच्या पलीकडे थोड्या अंतरावर लोकमान्य टिळक. करडा समुद्र आणि दूरपर्यंत पसरलेली वाळू. रस्त्यावरून वाहनांची गर्दी, चौपाटीवर माणसांची गर्दी. त्या गर्दीत एक तो. तीन वर्षाचा छोटा. चौपाटी त्याला खूप आवडायची.
वाळूचे डोंगर बनवायचे आणि स्वतःच ते तोडून टाकायचे हा तिथला त्याचा आवडता खेळ. वेगवेगळ्या लोकांबरोबर चौपाटी वेगवेगळी दिसायची. सकाळी आजीबरोबर फिरायला गेल्यावर, तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या गोतावळ्यात बसून ऐकायच्या गप्पांची मजा वेगळी. घरी परतताना उचललेली बदामाची फुलं आणि चाफ्याच्या फुलाची आजीने बनवून दिलेली अंगठी, त्याची मजा वेगळी. आणि आई बाबांबरोबर रविवारी संध्याकाळी चौपाटीवर जाऊन केलेली मजा वेगळी.
पण आजची संध्याकाळ जरा वेगळी होती. त्याच्याबरोबर त्याची आजी नव्हती आणि आई बाबाही. चाळीतल्या दोन काकूंनी त्यांच्या मुलांसोबत इतरही मुलांना चौपाटीला नेण्याचा घाट घातला होता. सगळ्या मित्रमंडळींबरोबर खूप खेळायला मिळणार ह्या आनंदातच तो चौपाटीला गेला.
रोज खेळतात तसाच कुठलातरी खेळ सगळे खेळायला लागले. इथे मुलांचा खेळ रंगला तशा तिथे काकूंच्या गप्प रंगायला लागल्या. कसला खेळ कोण जाणे पण खेळता खेळता आपल्या ह्या छोटूच्या पायातनं त्याची चप्पल सटकली. धावता धावता म्हणा किंवा कसंही म्हणा पण त्याच्या ते लक्षात आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याला त्याची चप्पल मिळेना.
छोटूच्या एकदा मनात आलं की आपण जाऊन काकूंना सांगावं की चप्पल हरवली. पण मग त्याला वाटलं नकोच सांगायला. चप्पल काय इथेच कुठे असेल. आपले मित्र आणि काकू कुठे आहेत हे छोटूनं एकदा नीट बघून घेतलं. एका काकूंनी निळी साडी घातली होती आणि दुसऱ्या काकूंनी पिवळी साडी घातली होती. त्याने मनात हे नक्की लक्षात ठेवलं आणि तो चप्पल शोधायला लागला.
चालत चालत कुठे गेला कोण जाणे. चप्पल तर त्याला मिळाली नाहीच पण आता काकू आणि मित्रही दिसेनासे झाले. आता काय करायचं? छोटू एकदम रडकुंडीला आला. पण त्याने अजिबात धीर सोडला नाही. त्याने स्वतःला समजावलं की एका काकूंनी पिवळी साडी आणि दुसऱ्या काकूंनी निळी साडी घातली आहे. आपल्याला त्या नक्की दिसतील. त्यानी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. दूर कुठेतरी त्याला निळ्या पिवळ्याचं काँबिनेशन दिसलं. जितक्या वेगात शक्य होतं तितक्या वेगात तो त्या दिशेने गेला. आपले मित्र काकू भेटणार म्हणून खूश झाला. पण जवळ जाऊन पाहातो तो काय? ते कुणी दुसरेच होते.
असं करत करत तो एका निळ्या पिवळ्या काँबिनेशन कडून दुसऱ्या कडून तिसऱ्या करत करत कुठे गेला कोण जाणे. इथे काकूंच्या लक्षात अलं की छोटू कुठे दिसत नाहीये. त्यांनी आजूबाजूला शोधलं, तरी मिळाला नाही. तीन वर्षाचा गोरा गोमटा छोटू हरवला तरी कुठे? आता छोटूच्या आईबाबांना उत्तर काय द्यायचं? ह्या प्रश्नाने काकूंनापण रडू आलं. पण तिथे वेळ दवडण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण शोधूनही छोटू सापडला नव्हता. त्या तशाच चाळीत परत आल्या. झाला प्रकार त्यांनी छोटूच्या आईबाबांना, सगळ्यांनाच सांगितला. लगेच सूत्र हलली. कुणी पोलिसात फोन केला. आई बाबा तसेच छोटूला शोधायला निघाले. अख्खी चाळ छोटूला शोधायला बाहेर पडली. आजी तेवढी घरी राहिली.
सगळ्यांनी शोध शोध शोधला. कुठे गेला कोण जाणे संध्याकाळ सरून अंधार पडायला लागला, तरी छोटूचा पत्ता लागला नाही. सगळे हवालदिल झाले. चौपाटीवर फिरून फिरून पाय दुखले तरी छोटूचे आई बाबा हार मानायला तयार नव्हते. मनात वाईट साईट विचार येत होते पण तरीही ते छोटूला शोधत होते. शोधणार होते.
-----------
एक माणूस खुर्चीत बसलेला. त्याच्यासमोर एक मुलगा उभा. माणूस मुलाला, त्याच्या आवडीचं सुरदासाचं भजन म्हणायला सांगतो. मुलगा आनंदाने "दर्शन दो घनशाम" हे त्याला शिकवलेलं भजन म्हणायला लागतो. खुर्चीत बसलेल्या माणसाला आपलं भजन आवडलं तर आपलं कल्याण होईल म्हणून मुलगा मनापासून गात असतो. मुलाचं भजन खरंच चांगलं होतं. खुर्चीत बसलेल्या माणसालाही ते आवडतं. तो टाळ्या वाजवत उठतो आणि मुलाचं कौतूक करता करताच बाजूला उभ्या असलेल्या माणसाला खूण करतो. इशारा मिळताच उभा असलेला माणूस कसलासा फडका मुलाच्या नाका तोंडाला लावतो. मुलगा बेशुद्ध पडतो. त्याला आडवा झोपवला जातो. त्याचा एक डोळा उघडून तापतं तेल त्याच्यावर ओतलं जातं. मुलाचा एक डोळा कायमचा जातो.
आता जन्मभर मुलगा आंधळा भिकारी म्हणून जगणार असतो.
-------------
ब्याऐंशीच्या त्याच संध्याकाळी एक मारवाडी कुटुंब मलबार हीलच्या बाजूला चौपाटीवर बसलेलं. दोघं नवरा बायको आणि त्यांची मुलगी. थोड्या अंतरावरंच एक मुसलमान कुटुंब बसलेलं असतं. त्या दोन्ही कुटुंबांच्या मधल्या जागेत एक गोरा गोमटा लहान मुलगा काहीतरी करत असतो. मारवाडी बाई आपल्या नवऱ्याला म्हणते की बहुतेक हा मुलगा हरवल्यासारखा वाटतोय. नवरा, बायकोकडे दुर्लक्ष करतो. म्हणतो ते मुसलमान कुटुंव आहे, त्यांच्यातलाच असेल तो.
बाईचं समाधान होत नाही. ती त्या मुलाला निरखत राहते. तितक्यात काहीतरी तिला एकदम लक्षात येतं. ती तिच्या नवऱ्याला म्हणते की हा मुसलमान असणं शक्यच नाही. त्याचे कान टोचलेले आहेत.
आता नवऱ्याला बायकोचं म्हणणं पटतं. जवळ जाऊन तो मुलाची चौकशी करतो. खरंच तो मुलगा हरवलेला असतो. आपल्या बोबड्या भाषेत तो आपला पत्ताही सांगतो, पण त्या मारवाडी माणसाला त्याचं बोलणं नीटसं कळत नाही. थोडा वेळ नवरा बायको कुणी शोधायला येतं का ह्याची वाट पाहायचं ठरवतात. मुलगा त्यांच्या मुलीबरोबर खेळण्यात रमतो. मारवाडी मुलांना गंडेरी घेऊन देतो. मुलगा आपण हरवलोय हे पूर्णपणे विसरून जातो. थोडा वेळ वाट पाहूनही कुणीच येत नाही. ते मुलाला पोलिसात घेउन जायचं ठरवतात. ती बाई नवऱ्याला स्पष्ट सांगते की ह्याचं कुणी सापडलं नाही तर त्याला आपण वाऱ्यावर सोडायचा नाही, सरळ घरी घेऊन जायचा.
...........
छोटूच्या शेजाऱ्यांचा फोन खणखणतो. फोन पोलिसांचा असतो. छोटू सापडल्याचा. चाळीत एकच जल्लोश होतो. छोटूला आणायला घरी असलेली त्याची आजी पोहोचते. कुणीतरी चौपाटीवर निरोप घेऊन जातो छोटूच्या आईबाबांसाठी. मोठ्या खुशीतच छोटू घरी परत येतो.
...........
"स्लमडॉग मिलेनेअर" पाहताना एकदम ह्या छोटूची खूप आठवण आली.
ते मारवाडी कुटुंब नसतं, तर काय झालं असतं छोटूचं? गरम तेलाने अधू झालेला डोळा घेऊन जन्मभर त्याला भीक मागत फिरावं लागलं असतं का?
नशीब चांगलं होतं......
छोटूचं.
वाळूचे डोंगर बनवायचे आणि स्वतःच ते तोडून टाकायचे हा तिथला त्याचा आवडता खेळ. वेगवेगळ्या लोकांबरोबर चौपाटी वेगवेगळी दिसायची. सकाळी आजीबरोबर फिरायला गेल्यावर, तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या गोतावळ्यात बसून ऐकायच्या गप्पांची मजा वेगळी. घरी परतताना उचललेली बदामाची फुलं आणि चाफ्याच्या फुलाची आजीने बनवून दिलेली अंगठी, त्याची मजा वेगळी. आणि आई बाबांबरोबर रविवारी संध्याकाळी चौपाटीवर जाऊन केलेली मजा वेगळी.
पण आजची संध्याकाळ जरा वेगळी होती. त्याच्याबरोबर त्याची आजी नव्हती आणि आई बाबाही. चाळीतल्या दोन काकूंनी त्यांच्या मुलांसोबत इतरही मुलांना चौपाटीला नेण्याचा घाट घातला होता. सगळ्या मित्रमंडळींबरोबर खूप खेळायला मिळणार ह्या आनंदातच तो चौपाटीला गेला.
रोज खेळतात तसाच कुठलातरी खेळ सगळे खेळायला लागले. इथे मुलांचा खेळ रंगला तशा तिथे काकूंच्या गप्प रंगायला लागल्या. कसला खेळ कोण जाणे पण खेळता खेळता आपल्या ह्या छोटूच्या पायातनं त्याची चप्पल सटकली. धावता धावता म्हणा किंवा कसंही म्हणा पण त्याच्या ते लक्षात आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याला त्याची चप्पल मिळेना.
छोटूच्या एकदा मनात आलं की आपण जाऊन काकूंना सांगावं की चप्पल हरवली. पण मग त्याला वाटलं नकोच सांगायला. चप्पल काय इथेच कुठे असेल. आपले मित्र आणि काकू कुठे आहेत हे छोटूनं एकदा नीट बघून घेतलं. एका काकूंनी निळी साडी घातली होती आणि दुसऱ्या काकूंनी पिवळी साडी घातली होती. त्याने मनात हे नक्की लक्षात ठेवलं आणि तो चप्पल शोधायला लागला.
चालत चालत कुठे गेला कोण जाणे. चप्पल तर त्याला मिळाली नाहीच पण आता काकू आणि मित्रही दिसेनासे झाले. आता काय करायचं? छोटू एकदम रडकुंडीला आला. पण त्याने अजिबात धीर सोडला नाही. त्याने स्वतःला समजावलं की एका काकूंनी पिवळी साडी आणि दुसऱ्या काकूंनी निळी साडी घातली आहे. आपल्याला त्या नक्की दिसतील. त्यानी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. दूर कुठेतरी त्याला निळ्या पिवळ्याचं काँबिनेशन दिसलं. जितक्या वेगात शक्य होतं तितक्या वेगात तो त्या दिशेने गेला. आपले मित्र काकू भेटणार म्हणून खूश झाला. पण जवळ जाऊन पाहातो तो काय? ते कुणी दुसरेच होते.
असं करत करत तो एका निळ्या पिवळ्या काँबिनेशन कडून दुसऱ्या कडून तिसऱ्या करत करत कुठे गेला कोण जाणे. इथे काकूंच्या लक्षात अलं की छोटू कुठे दिसत नाहीये. त्यांनी आजूबाजूला शोधलं, तरी मिळाला नाही. तीन वर्षाचा गोरा गोमटा छोटू हरवला तरी कुठे? आता छोटूच्या आईबाबांना उत्तर काय द्यायचं? ह्या प्रश्नाने काकूंनापण रडू आलं. पण तिथे वेळ दवडण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण शोधूनही छोटू सापडला नव्हता. त्या तशाच चाळीत परत आल्या. झाला प्रकार त्यांनी छोटूच्या आईबाबांना, सगळ्यांनाच सांगितला. लगेच सूत्र हलली. कुणी पोलिसात फोन केला. आई बाबा तसेच छोटूला शोधायला निघाले. अख्खी चाळ छोटूला शोधायला बाहेर पडली. आजी तेवढी घरी राहिली.
सगळ्यांनी शोध शोध शोधला. कुठे गेला कोण जाणे संध्याकाळ सरून अंधार पडायला लागला, तरी छोटूचा पत्ता लागला नाही. सगळे हवालदिल झाले. चौपाटीवर फिरून फिरून पाय दुखले तरी छोटूचे आई बाबा हार मानायला तयार नव्हते. मनात वाईट साईट विचार येत होते पण तरीही ते छोटूला शोधत होते. शोधणार होते.
-----------
एक माणूस खुर्चीत बसलेला. त्याच्यासमोर एक मुलगा उभा. माणूस मुलाला, त्याच्या आवडीचं सुरदासाचं भजन म्हणायला सांगतो. मुलगा आनंदाने "दर्शन दो घनशाम" हे त्याला शिकवलेलं भजन म्हणायला लागतो. खुर्चीत बसलेल्या माणसाला आपलं भजन आवडलं तर आपलं कल्याण होईल म्हणून मुलगा मनापासून गात असतो. मुलाचं भजन खरंच चांगलं होतं. खुर्चीत बसलेल्या माणसालाही ते आवडतं. तो टाळ्या वाजवत उठतो आणि मुलाचं कौतूक करता करताच बाजूला उभ्या असलेल्या माणसाला खूण करतो. इशारा मिळताच उभा असलेला माणूस कसलासा फडका मुलाच्या नाका तोंडाला लावतो. मुलगा बेशुद्ध पडतो. त्याला आडवा झोपवला जातो. त्याचा एक डोळा उघडून तापतं तेल त्याच्यावर ओतलं जातं. मुलाचा एक डोळा कायमचा जातो.
आता जन्मभर मुलगा आंधळा भिकारी म्हणून जगणार असतो.
-------------
ब्याऐंशीच्या त्याच संध्याकाळी एक मारवाडी कुटुंब मलबार हीलच्या बाजूला चौपाटीवर बसलेलं. दोघं नवरा बायको आणि त्यांची मुलगी. थोड्या अंतरावरंच एक मुसलमान कुटुंब बसलेलं असतं. त्या दोन्ही कुटुंबांच्या मधल्या जागेत एक गोरा गोमटा लहान मुलगा काहीतरी करत असतो. मारवाडी बाई आपल्या नवऱ्याला म्हणते की बहुतेक हा मुलगा हरवल्यासारखा वाटतोय. नवरा, बायकोकडे दुर्लक्ष करतो. म्हणतो ते मुसलमान कुटुंव आहे, त्यांच्यातलाच असेल तो.
बाईचं समाधान होत नाही. ती त्या मुलाला निरखत राहते. तितक्यात काहीतरी तिला एकदम लक्षात येतं. ती तिच्या नवऱ्याला म्हणते की हा मुसलमान असणं शक्यच नाही. त्याचे कान टोचलेले आहेत.
आता नवऱ्याला बायकोचं म्हणणं पटतं. जवळ जाऊन तो मुलाची चौकशी करतो. खरंच तो मुलगा हरवलेला असतो. आपल्या बोबड्या भाषेत तो आपला पत्ताही सांगतो, पण त्या मारवाडी माणसाला त्याचं बोलणं नीटसं कळत नाही. थोडा वेळ नवरा बायको कुणी शोधायला येतं का ह्याची वाट पाहायचं ठरवतात. मुलगा त्यांच्या मुलीबरोबर खेळण्यात रमतो. मारवाडी मुलांना गंडेरी घेऊन देतो. मुलगा आपण हरवलोय हे पूर्णपणे विसरून जातो. थोडा वेळ वाट पाहूनही कुणीच येत नाही. ते मुलाला पोलिसात घेउन जायचं ठरवतात. ती बाई नवऱ्याला स्पष्ट सांगते की ह्याचं कुणी सापडलं नाही तर त्याला आपण वाऱ्यावर सोडायचा नाही, सरळ घरी घेऊन जायचा.
...........
छोटूच्या शेजाऱ्यांचा फोन खणखणतो. फोन पोलिसांचा असतो. छोटू सापडल्याचा. चाळीत एकच जल्लोश होतो. छोटूला आणायला घरी असलेली त्याची आजी पोहोचते. कुणीतरी चौपाटीवर निरोप घेऊन जातो छोटूच्या आईबाबांसाठी. मोठ्या खुशीतच छोटू घरी परत येतो.
...........
"स्लमडॉग मिलेनेअर" पाहताना एकदम ह्या छोटूची खूप आठवण आली.
ते मारवाडी कुटुंब नसतं, तर काय झालं असतं छोटूचं? गरम तेलाने अधू झालेला डोळा घेऊन जन्मभर त्याला भीक मागत फिरावं लागलं असतं का?
नशीब चांगलं होतं......
छोटूचं.
आपला,
कोहम
11
देवाणघेवाणी
Friday, January 30, 2009
निर्णय
ती मीटिंग रूम मधून बाहेर पडली. डोक्यात नुसता विचारांचा गलका झाला होता. गेल्या महिन्यातली सुखीलाल ची कॅंपेन, त्यातलं तिचं आर्टवर्क, ते कौतुक, ती प्रसिद्धी, रात्र रात्र जागून केलेली डिझाइन्स, बॉसने अचानक पाठवलेला इ-मेल, आताची मीटिंग आणि बेंगलोरच्या ऑफिसमध्ये चालून आलेली, भरभक्कम पगाराची बढती. क्षणभर तिचा कानांवर विश्वासच बसला नाही की तिला ही संधी देण्यात आलेय.
अवघ्या दीड वर्षात एवढी प्रगती? बेला होण्याआधी नोकरी सोडली. जरा कुठे नोकरीत बस्तान बसत होतं, पण बेलाचा जन्म ही पण गरजच होती. ती टाळता येण्यासारखी नव्हती. लहान मुलगी आईवाचून नको म्हणून चांगली तीन वर्ष घरी राहिली. मग ही नोकरी. लहान मुलगी, घर सगळं सांभाळून केलेली नोकरीची कसरत. सगळं, सगळं तिला आठवलं. कामाचं चीज झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं.
आपल्या डेस्क पाशी येताच तिने तिचा मोबाईल पाहिला. घरून तीन वेळा फोन आला होता. अचानक तिला वास्तवाची जाणीव झाली. हातातल्या घड्याळात तिने नजर टाकली. सात वाजून गेले होते. म्हणजे बेला घरी पोचली असणार आणि अनीषही. घाईघाईने तिने आपला काँप्यूटर बंद केला आणि ती जिने उतरू लागली.
मुंबईच्या फोर्ट एरिआमधलं कोणतंही ऑफिस असावं तसंच तिचंही होतं. आतून चकचकीत पण जिने मात्र कळकट. त्यात जिन्यातला बल्ब फुटला होता. लाकडी कठड्याला घट्ट धरून एकेक लाकडी पायरी ती उतरायला लागली. उगाचच जिनाभरल्या अंधारानं तिला घाबरायला झालं. कठड्यावरची पकड अजूनही घट्ट झाली. एकटेपणाची जाणीव अधिकच वाढली. डोळ्यासमोर आई उभी राहिली. नेहमी ओरडायची आई, एकटीने उशीरापर्यंत बाहेर राहू नको म्हणून. कारण मुलीची जात. त्या क्षणीही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. उगीच का कोणी बाहेर राहतं उशीरापर्यंत? काम असतं, गरज असते, म्हणून राहायला लागतं. आईला काही शेवटपर्यंत पटलं नाही आपलं.
शेवटची पायरी उतरून ती इमारतीच्या बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला मोकळं वाटलं. समोरच फ्लोरा फाउंटन पसरलं होतं. हुतात्मा चौक. हुतात्मा चौकात अनाहूत आत्म्यांची गर्दी. स्वतःचीच कोटी आठवून तिला हसायला आलं. चालत चालत ती पासष्ट नंबरच्या बस स्टॉपवर पोहोचली. कोपऱ्यावर फुटपाथवरंच पुस्तकं मांडून विक्री चालली होती. तिला वाटलं, जरा जावं, दोन पुस्तकं चाळावीत, एखादं घ्यावं, एखादं बेलासाठी, एखादं अनीषसाठी. बेला आणि अनीषचा विचार आल्यावर मात्र पटकन घरी पोहोचायला हवं हे तिच्या ध्यानात आलं.
टॅक्सीनं जावं का? नकोच. बसनेच जाऊ. पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल. डबल डेकर बसचं तिला भयंकर आकर्षण होतं. लहान असताना ठीक होतं पण अजूनही? ती आपल्याच तंद्रीत होती. बस समोर थांबल्यावरच तिच्या लक्षात आलं. गर्दी नसेल असं वाटलं होतं पण बस खच्चून भरली होती. आजूबाजूच्या शरीरांना चुकवत ती वरच्या डेक वर पोहोचली. तिथंही बसायला जागा नव्हती. वरच्या काळ्या दांडीला धरून ती तशीच लोंबकळत राहिली.
बस सुरू झाली आणि पुन्हा तिला तिची मीटिंग आठवली. बंगलोरला बढती, मोठा पगार. पण कसं शक्य आहे? इथे अनीषची नोकरी, बेलाची शाळा. कसं जमणार हे सगळं? नाहीच होणार शक्य. पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही. माझ्यासाठी तो त्याची नोकरी सोडून किंवा बदलीही मिळवून बेंगलोरला कसा येणार? हजार कारणं सांगेल. मग करायचं तरी काय? एकटीने काही दिवस तिथे काढले तर, बेलाला घेऊन? मग नंतर पुन्हा इथे येता येईल, पण ही संधी हातची जाता कामा नये. माझंच असं का होतं? आधीची नोकरी ऐन भरात आलेली असताना बेलासाठी सोडावी लागली. तेव्हा मी नाही म्हटलं नाही. तीन वर्ष घरी वसून राहिले. बाई म्हणून एवढं पडतं घेतलं. नाही घ्यावंच लागलं. पण अजूनही..
बसने जोरात ब्रेक दाबला आणि ती भानावर आली. बस गर्दीनं खच्चून भरली होती आणि तिच्या मागे असलेला माणूस तिच्या जास्तच चिकटून उभा असल्याचं तिला जाणवलं. तिचा स्टॉपही जवळ येत होता. ती पटकन जिन्याच्या दिशेने निघाली. त्या माणसाचा निसटता घाणेरडा स्पर्श तिला चुकवता आला नाही. क्षणभर तिला तिचीच कीव आली. स्वतःची. एक बाई म्हणून, एक स्त्री म्हणून.
सुखीलाल ची कॅंपेन तिला आठवली. काहीही जाहिरात करा पण त्यात एक बाई पाहिजे. कशाला? बाईचं काम फक्त सुंदर दिसणं, घर सांभाळणं एवढंच आहे का? चूल आणि मूल म्हणे. अरे बाईकडे एक माणूस म्हणून बघा ना. फक्त मादी म्हणून, पुनरुत्पादनाचं यंत्र म्हणून का बघता? तिलाही काही आकांक्षा असतील, अपेक्षा असतील, त्यांची काळजी कोणी घ्यायची. एकेक विचारासरशी तिच्या डोक्यात घणाचे घाव बसायला लागले. आजूबाजूचं सगळं जग पुरुषांनी भरलंय आणि ते सगळेजण आपल्याकडे माना वेडावून हसतायत आणि आपल्याला "स्त्री", "स्त्री" म्हणून हिणवतायत असं तिला वाटलं.
तंद्रीतच ती आपल्या स्टॉपवर उतरली, घराकडे चालायला लागली. घर जसं जवळ येऊ लागलं तसं तिला बरं वाटायला लागलं. चावीने तिने घराचं लॅच उघडलं आणि ती आत शिरली. अनीष, म्हणून तिने हाक मारली. सुखीलाल च्या कॅंपेनबद्धल तिचं झालेलं कौतुक, आजची मीटिंग, सगळं, सगळं तिला त्याला सांगायचं होतं. चपला उचलून तिने स्टँडवर ठेवल्या आणि ती बेडरूमकडे गेली. तीही रिकामीच होती.
ती बेलाच्या खोलीत शिरणार, इतक्यात अनीष तिथूनच बाहेर आला. मघाशी पडणारे घणाचे घाव कधीच थांबले होते. आता तिला त्याला सगळं सांगायचं होतं. ती काही बोलणार इतक्यात त्याने खुणेनेच तिला शांत राहायला सांगितलं आणि तो तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेला.
आत शिरताच ती काही बोलणार इतक्यात अनीषच सुरू झाला
"कुठे होतीस इतका वेळ. अरे, काही घर, दार, नवरा, मुलगी ह्यांची आठवण आहे की नाही? का त्या फर्मला पूर्ण वाहून घेतलंयस तू? मोबाईल कशाला दिलाय? कधीही फोन करता यावा म्हणून ना? मग तो बंद का असतो नेहमी?"
"अरे पण मीटिंग...."
"मीटिंग गेली खड्ड्यात. कधीही फोन करा ही आपली मीटिंगमध्ये. काय चालवलंयस काय तू हे. मी घरी आलो, तर बेला पाय धरून बसलेली, खेळताना पडली, पायातून भळभळा रक्त येत होतं. म्हणाली आईला फोन केला पण आई फोन उचलत नाही. अरे हजारदा सांगितलंय तिला एकटं ठेवणं बरोबर नाही. उद्या तिला काही झालं तर काय करशील? त्यात तो फोन नुसता नावाला घेतलाय, कधी उचलतच नाहीस..."
"अनीष, सुखीलाल ची......"
"ए, आता त्या सुखीलाल चं नाव काढू नको हं. फार दिवस ऐकतोय. बघायलाच पाहिजे एकदा हा कोण सुखीलाल आहे ते. साला, माझ्यापेक्षा माझी बायको ह्याचंच नाव जास्त घेते."
"अनीष...."
"तुला काय वाटलं, मी न बोलता सगळं सहन करतो म्हणजे मला हे सगळं मान्य आहे? लग्नानंतर मी तुला नोकरी करू दिली. तुझ्या आशा आकांक्षा, तुझं करिअर, तुझ्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, ह्याची कल्पना होती म्हणून. प्रत्येक गोष्टीत तुला साथ दिली. एकटीला तुला परदेशी पण पाठवलं. पण बेला झाल्यावर तरी तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव नको का व्हायला? आता ती महत्त्वाची की तुझा सुखीलाल महत्त्वाचा?"
"अरे पण लग्न झाल्यावर तीन वर्ष होते ना मी घरी?"
"काय उपकार केलेस? आई म्हणून तुझं कर्तव्यच आहे ते. खरंतर मला हे असं तिला एकटं ठेवणं अजिबात मान्य नाही. तासाभरासाठी का होईना, ती एकटी राहता कामा नये. तू लवकर का नाही येत ऑफिसमधून?"
"अनीष, जेव्हा शक्य असतं तेव्हा येतेच ना?"
" हे बघ, जेव्हा शक्य असतं तेव्हा नाही. रोज यायला हवं. आता तूच ठरव बेला की तुझी नोकरी आणि काय तो निर्णय घे. तिथे ऑफिसात बॉसची कटकट आणि इथे घरी आल्यावर तुझी. नकोसं झालंय सगळं"
तिलाही सगळं नकोसं झालं होतं. आपण अजून बेलाला पाहिलंच नाही हे तिच्या ध्यानात आलं. अनीषला तिथेच सोडून ती बेलाच्या खोलीत गेली. बाजूचा दिवा जळत होता. आणि तिच्या छोट्याश्या बेडवर बेला झोपली होती. पायाला बँडेज लावलेलं दिसत होतं, पण चेहऱ्यावर मात्र हास्य होतं.
...कसली स्वप्न बघत असेल ही. चॉकलेटच्या बंगल्याची, चमचमणाऱ्या चांदण्यांची, ढगांच्या दुलईची आणि राजकुमाराची आणि राजकन्येची. आहेच माझी बेला राजकन्येसारखी. अगदी माझ्यासारखीच दिसते नाही. मोठी झाली की माझ्यासारखीच... नको. माझ्यासारखी नको. पण तिही एक स्त्रीच ना. मी तिला सांगणारच, एकटी उशीराने घराबाहेर राहू नको. सातच्या आत घरात ये. तिलाही लग्न करावं लागणारंच, मुलं होणार, मग ती, ती राहणारच नाही. मग ती होणार एक बाई, बायको, मादी, आई. हे सगळं पहिलं. तिची स्वप्न, तिच्या आशाआकांक्षा हे सगळं दुय्यम. सतत दुसऱ्यांचा विचार....
नकळत तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. दिवसभर जगाबरोबर भांडायचं, आणि घरी आल्यावर नवऱ्याशी. काय आयुष्य झालंय आपलं. हाताला झालेल्या कुणाच्यातरी स्पर्शाने ती भानावर आली. बेलाने तिचा हात हातात घेतला होता. तिच्या डोळ्यातही अश्रू उतरले होते.
"रडू नको ना आई. काय झालं?"
बेलाच्या ह्या एका प्रश्नानं तिच्या रडक्या चेहऱ्यावर हसू फुटलं. आवेगाने तिने बेलाला जवळ घेतलं.
"नाही रडणार हं बाळा. तुला लागलं ना म्हणून मला रडायला आलं. मी नव्हते ना घरी तेव्हा, माझ्या बाळाची काळजी घ्यायला"
"आई, मी तुला फोन केला तीनदा. तू उचलाच नाहीस. मला इतका राग आला होता ना तेव्हा. तितक्यात बाबा आला. मला डॉक्टर काकांकडे घेऊन गेला. मी त्याला सांगितलं मला आईचा राग आला म्हणून. पण तो म्हणाला, आईवर असं रागावायचं नाही, आईला खूप काम असतं ना म्हणून नाही घेता येत तिला फोन. त्याने मला तुझी नवी ऍडपण दाखवली पेपरमधली. मस्त आहे हं फोटो. मग माझा राग कुठल्या कुठे पळून गेला"
तिच्याकडे बोलायला काही उरलंच नव्हतं. इतक्यात मागून अनीष आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणाला
"सॉरी. मघाशी जरा जास्तच बोलून गेलो. खरंच सॉरी. राग तुझ्यावर नव्हता. पण तुझ्यावर निघाला. शेवटी मला हक्काची तूच आहेस ना? सॉरी."
तिने डोकं त्याच्या हाताला टेकलं. खूप खूप बरं वाटलं तिला. अनीष आणि बेला असे जवळ असताना आणखी काय पाहिजे? मनात एकदा आलं की अनीषला सुखीलालचं कौतुक, बॉसने दिलेली ऑफर सांगावी. पण ही वेळ तिला योग्य वाटली नाही.
तिला दोन्ही हवं होतं. चांगलं करिअर आणि सुखी संसार. आणि तिच्या बाबतीत तरी दोन्ही एकाच वेळी घडणं शक्य नव्हतं. आता खरंच तिला निर्णय घ्यायचा होता. खरंच ती निर्णय घेऊ शकणार होती का? की सतत असं शक्यतांच्या झोपाळ्यांवर झोके घेत राहणार होती? कोणताही निर्णय न घेता?
अवघ्या दीड वर्षात एवढी प्रगती? बेला होण्याआधी नोकरी सोडली. जरा कुठे नोकरीत बस्तान बसत होतं, पण बेलाचा जन्म ही पण गरजच होती. ती टाळता येण्यासारखी नव्हती. लहान मुलगी आईवाचून नको म्हणून चांगली तीन वर्ष घरी राहिली. मग ही नोकरी. लहान मुलगी, घर सगळं सांभाळून केलेली नोकरीची कसरत. सगळं, सगळं तिला आठवलं. कामाचं चीज झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं.
आपल्या डेस्क पाशी येताच तिने तिचा मोबाईल पाहिला. घरून तीन वेळा फोन आला होता. अचानक तिला वास्तवाची जाणीव झाली. हातातल्या घड्याळात तिने नजर टाकली. सात वाजून गेले होते. म्हणजे बेला घरी पोचली असणार आणि अनीषही. घाईघाईने तिने आपला काँप्यूटर बंद केला आणि ती जिने उतरू लागली.
मुंबईच्या फोर्ट एरिआमधलं कोणतंही ऑफिस असावं तसंच तिचंही होतं. आतून चकचकीत पण जिने मात्र कळकट. त्यात जिन्यातला बल्ब फुटला होता. लाकडी कठड्याला घट्ट धरून एकेक लाकडी पायरी ती उतरायला लागली. उगाचच जिनाभरल्या अंधारानं तिला घाबरायला झालं. कठड्यावरची पकड अजूनही घट्ट झाली. एकटेपणाची जाणीव अधिकच वाढली. डोळ्यासमोर आई उभी राहिली. नेहमी ओरडायची आई, एकटीने उशीरापर्यंत बाहेर राहू नको म्हणून. कारण मुलीची जात. त्या क्षणीही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. उगीच का कोणी बाहेर राहतं उशीरापर्यंत? काम असतं, गरज असते, म्हणून राहायला लागतं. आईला काही शेवटपर्यंत पटलं नाही आपलं.
शेवटची पायरी उतरून ती इमारतीच्या बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला मोकळं वाटलं. समोरच फ्लोरा फाउंटन पसरलं होतं. हुतात्मा चौक. हुतात्मा चौकात अनाहूत आत्म्यांची गर्दी. स्वतःचीच कोटी आठवून तिला हसायला आलं. चालत चालत ती पासष्ट नंबरच्या बस स्टॉपवर पोहोचली. कोपऱ्यावर फुटपाथवरंच पुस्तकं मांडून विक्री चालली होती. तिला वाटलं, जरा जावं, दोन पुस्तकं चाळावीत, एखादं घ्यावं, एखादं बेलासाठी, एखादं अनीषसाठी. बेला आणि अनीषचा विचार आल्यावर मात्र पटकन घरी पोहोचायला हवं हे तिच्या ध्यानात आलं.
टॅक्सीनं जावं का? नकोच. बसनेच जाऊ. पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल. डबल डेकर बसचं तिला भयंकर आकर्षण होतं. लहान असताना ठीक होतं पण अजूनही? ती आपल्याच तंद्रीत होती. बस समोर थांबल्यावरच तिच्या लक्षात आलं. गर्दी नसेल असं वाटलं होतं पण बस खच्चून भरली होती. आजूबाजूच्या शरीरांना चुकवत ती वरच्या डेक वर पोहोचली. तिथंही बसायला जागा नव्हती. वरच्या काळ्या दांडीला धरून ती तशीच लोंबकळत राहिली.
बस सुरू झाली आणि पुन्हा तिला तिची मीटिंग आठवली. बंगलोरला बढती, मोठा पगार. पण कसं शक्य आहे? इथे अनीषची नोकरी, बेलाची शाळा. कसं जमणार हे सगळं? नाहीच होणार शक्य. पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही. माझ्यासाठी तो त्याची नोकरी सोडून किंवा बदलीही मिळवून बेंगलोरला कसा येणार? हजार कारणं सांगेल. मग करायचं तरी काय? एकटीने काही दिवस तिथे काढले तर, बेलाला घेऊन? मग नंतर पुन्हा इथे येता येईल, पण ही संधी हातची जाता कामा नये. माझंच असं का होतं? आधीची नोकरी ऐन भरात आलेली असताना बेलासाठी सोडावी लागली. तेव्हा मी नाही म्हटलं नाही. तीन वर्ष घरी वसून राहिले. बाई म्हणून एवढं पडतं घेतलं. नाही घ्यावंच लागलं. पण अजूनही..
बसने जोरात ब्रेक दाबला आणि ती भानावर आली. बस गर्दीनं खच्चून भरली होती आणि तिच्या मागे असलेला माणूस तिच्या जास्तच चिकटून उभा असल्याचं तिला जाणवलं. तिचा स्टॉपही जवळ येत होता. ती पटकन जिन्याच्या दिशेने निघाली. त्या माणसाचा निसटता घाणेरडा स्पर्श तिला चुकवता आला नाही. क्षणभर तिला तिचीच कीव आली. स्वतःची. एक बाई म्हणून, एक स्त्री म्हणून.
सुखीलाल ची कॅंपेन तिला आठवली. काहीही जाहिरात करा पण त्यात एक बाई पाहिजे. कशाला? बाईचं काम फक्त सुंदर दिसणं, घर सांभाळणं एवढंच आहे का? चूल आणि मूल म्हणे. अरे बाईकडे एक माणूस म्हणून बघा ना. फक्त मादी म्हणून, पुनरुत्पादनाचं यंत्र म्हणून का बघता? तिलाही काही आकांक्षा असतील, अपेक्षा असतील, त्यांची काळजी कोणी घ्यायची. एकेक विचारासरशी तिच्या डोक्यात घणाचे घाव बसायला लागले. आजूबाजूचं सगळं जग पुरुषांनी भरलंय आणि ते सगळेजण आपल्याकडे माना वेडावून हसतायत आणि आपल्याला "स्त्री", "स्त्री" म्हणून हिणवतायत असं तिला वाटलं.
तंद्रीतच ती आपल्या स्टॉपवर उतरली, घराकडे चालायला लागली. घर जसं जवळ येऊ लागलं तसं तिला बरं वाटायला लागलं. चावीने तिने घराचं लॅच उघडलं आणि ती आत शिरली. अनीष, म्हणून तिने हाक मारली. सुखीलाल च्या कॅंपेनबद्धल तिचं झालेलं कौतुक, आजची मीटिंग, सगळं, सगळं तिला त्याला सांगायचं होतं. चपला उचलून तिने स्टँडवर ठेवल्या आणि ती बेडरूमकडे गेली. तीही रिकामीच होती.
ती बेलाच्या खोलीत शिरणार, इतक्यात अनीष तिथूनच बाहेर आला. मघाशी पडणारे घणाचे घाव कधीच थांबले होते. आता तिला त्याला सगळं सांगायचं होतं. ती काही बोलणार इतक्यात त्याने खुणेनेच तिला शांत राहायला सांगितलं आणि तो तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेला.
आत शिरताच ती काही बोलणार इतक्यात अनीषच सुरू झाला
"कुठे होतीस इतका वेळ. अरे, काही घर, दार, नवरा, मुलगी ह्यांची आठवण आहे की नाही? का त्या फर्मला पूर्ण वाहून घेतलंयस तू? मोबाईल कशाला दिलाय? कधीही फोन करता यावा म्हणून ना? मग तो बंद का असतो नेहमी?"
"अरे पण मीटिंग...."
"मीटिंग गेली खड्ड्यात. कधीही फोन करा ही आपली मीटिंगमध्ये. काय चालवलंयस काय तू हे. मी घरी आलो, तर बेला पाय धरून बसलेली, खेळताना पडली, पायातून भळभळा रक्त येत होतं. म्हणाली आईला फोन केला पण आई फोन उचलत नाही. अरे हजारदा सांगितलंय तिला एकटं ठेवणं बरोबर नाही. उद्या तिला काही झालं तर काय करशील? त्यात तो फोन नुसता नावाला घेतलाय, कधी उचलतच नाहीस..."
"अनीष, सुखीलाल ची......"
"ए, आता त्या सुखीलाल चं नाव काढू नको हं. फार दिवस ऐकतोय. बघायलाच पाहिजे एकदा हा कोण सुखीलाल आहे ते. साला, माझ्यापेक्षा माझी बायको ह्याचंच नाव जास्त घेते."
"अनीष...."
"तुला काय वाटलं, मी न बोलता सगळं सहन करतो म्हणजे मला हे सगळं मान्य आहे? लग्नानंतर मी तुला नोकरी करू दिली. तुझ्या आशा आकांक्षा, तुझं करिअर, तुझ्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, ह्याची कल्पना होती म्हणून. प्रत्येक गोष्टीत तुला साथ दिली. एकटीला तुला परदेशी पण पाठवलं. पण बेला झाल्यावर तरी तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव नको का व्हायला? आता ती महत्त्वाची की तुझा सुखीलाल महत्त्वाचा?"
"अरे पण लग्न झाल्यावर तीन वर्ष होते ना मी घरी?"
"काय उपकार केलेस? आई म्हणून तुझं कर्तव्यच आहे ते. खरंतर मला हे असं तिला एकटं ठेवणं अजिबात मान्य नाही. तासाभरासाठी का होईना, ती एकटी राहता कामा नये. तू लवकर का नाही येत ऑफिसमधून?"
"अनीष, जेव्हा शक्य असतं तेव्हा येतेच ना?"
" हे बघ, जेव्हा शक्य असतं तेव्हा नाही. रोज यायला हवं. आता तूच ठरव बेला की तुझी नोकरी आणि काय तो निर्णय घे. तिथे ऑफिसात बॉसची कटकट आणि इथे घरी आल्यावर तुझी. नकोसं झालंय सगळं"
तिलाही सगळं नकोसं झालं होतं. आपण अजून बेलाला पाहिलंच नाही हे तिच्या ध्यानात आलं. अनीषला तिथेच सोडून ती बेलाच्या खोलीत गेली. बाजूचा दिवा जळत होता. आणि तिच्या छोट्याश्या बेडवर बेला झोपली होती. पायाला बँडेज लावलेलं दिसत होतं, पण चेहऱ्यावर मात्र हास्य होतं.
...कसली स्वप्न बघत असेल ही. चॉकलेटच्या बंगल्याची, चमचमणाऱ्या चांदण्यांची, ढगांच्या दुलईची आणि राजकुमाराची आणि राजकन्येची. आहेच माझी बेला राजकन्येसारखी. अगदी माझ्यासारखीच दिसते नाही. मोठी झाली की माझ्यासारखीच... नको. माझ्यासारखी नको. पण तिही एक स्त्रीच ना. मी तिला सांगणारच, एकटी उशीराने घराबाहेर राहू नको. सातच्या आत घरात ये. तिलाही लग्न करावं लागणारंच, मुलं होणार, मग ती, ती राहणारच नाही. मग ती होणार एक बाई, बायको, मादी, आई. हे सगळं पहिलं. तिची स्वप्न, तिच्या आशाआकांक्षा हे सगळं दुय्यम. सतत दुसऱ्यांचा विचार....
नकळत तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. दिवसभर जगाबरोबर भांडायचं, आणि घरी आल्यावर नवऱ्याशी. काय आयुष्य झालंय आपलं. हाताला झालेल्या कुणाच्यातरी स्पर्शाने ती भानावर आली. बेलाने तिचा हात हातात घेतला होता. तिच्या डोळ्यातही अश्रू उतरले होते.
"रडू नको ना आई. काय झालं?"
बेलाच्या ह्या एका प्रश्नानं तिच्या रडक्या चेहऱ्यावर हसू फुटलं. आवेगाने तिने बेलाला जवळ घेतलं.
"नाही रडणार हं बाळा. तुला लागलं ना म्हणून मला रडायला आलं. मी नव्हते ना घरी तेव्हा, माझ्या बाळाची काळजी घ्यायला"
"आई, मी तुला फोन केला तीनदा. तू उचलाच नाहीस. मला इतका राग आला होता ना तेव्हा. तितक्यात बाबा आला. मला डॉक्टर काकांकडे घेऊन गेला. मी त्याला सांगितलं मला आईचा राग आला म्हणून. पण तो म्हणाला, आईवर असं रागावायचं नाही, आईला खूप काम असतं ना म्हणून नाही घेता येत तिला फोन. त्याने मला तुझी नवी ऍडपण दाखवली पेपरमधली. मस्त आहे हं फोटो. मग माझा राग कुठल्या कुठे पळून गेला"
तिच्याकडे बोलायला काही उरलंच नव्हतं. इतक्यात मागून अनीष आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणाला
"सॉरी. मघाशी जरा जास्तच बोलून गेलो. खरंच सॉरी. राग तुझ्यावर नव्हता. पण तुझ्यावर निघाला. शेवटी मला हक्काची तूच आहेस ना? सॉरी."
तिने डोकं त्याच्या हाताला टेकलं. खूप खूप बरं वाटलं तिला. अनीष आणि बेला असे जवळ असताना आणखी काय पाहिजे? मनात एकदा आलं की अनीषला सुखीलालचं कौतुक, बॉसने दिलेली ऑफर सांगावी. पण ही वेळ तिला योग्य वाटली नाही.
तिला दोन्ही हवं होतं. चांगलं करिअर आणि सुखी संसार. आणि तिच्या बाबतीत तरी दोन्ही एकाच वेळी घडणं शक्य नव्हतं. आता खरंच तिला निर्णय घ्यायचा होता. खरंच ती निर्णय घेऊ शकणार होती का? की सतत असं शक्यतांच्या झोपाळ्यांवर झोके घेत राहणार होती? कोणताही निर्णय न घेता?
आपला,
कोहम
24
देवाणघेवाणी
Subscribe to:
Posts (Atom)